लेख क्र. ७ आयुष्यातील पूर्णविराम
तुम्हाला नुसत्या शीर्षकावरून प्रश्न पडला असेल की 'आयुष्यातील पूर्णविराम' म्हणजे काय?
ते समजून घेण्यासाठी तुम्हाला कदाचित संपूर्ण लेख वाचावा लागेल.
आयुष्यातील पूर्णविराम हा स्वतः मध्येच एक वेगळा विषय आहे. या शब्दांचा कुठेही ताळमेळ
नसतांना मला वाटल की या गोष्टीवर लिहावं, पण हाच प्रश्न मला ही पडला होता की काय लिहावं. पण खूप विचार करून
लिहिलेला लेख..
आयुष्यातील पूर्णविराम, मित्रांनो आयुष्य जगात असताना आपल्याला खुप नवं नवीन गोष्टी
शिकायला किंवा अनुभवायला मिळतात. आपल्याला काही गोष्टी वापरायला ही मिळतात आणि त्या वापरायला मिळालेल्या
गोष्टी ह्या काही ठराविक वेळेपुरत्या वापरायला मिळालेल्या असतात. पण त्या गोष्टींन बद्दल आपल्याला हव्यास
वाटतो किंवा त्या गोष्टी आपल्याला हव्या-हव्याश्या वाटतात, पण त्याच गोष्टी परत मिळवणं चांगल आहे, पण ते
स्वतः कमावून. दुसऱ्याच हिसकावून नाही. दुसऱ्यांकडून हिसकावून घेऊन त्या गोष्टी वापरायला काहीच अर्थ नाही.
कारण त्या गोष्टी मध्ये आपला स्वार्थ असतो ना. त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण सज्ज होतो, पण त्या वेळी
आपल्याला आपला स्वार्थ दिसत असतो, पण दुसऱ्यांना त्याच्या पासून काय हनी होणार आहे. हे आपल्याला कळतच नसत.
आपण त्या वेळी दुसऱ्यांचा विचारच करत नसतो. दुसऱ्यांबद्दल आपल्याला काही घेणेदेणे नसत आणि घ्याच स्वार्थ पाई
लोक खूप मोठी-मोठी नाती गमावतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना वापरण म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा
मारून घेण्यासारखं असत,कारण जर समोरच्या वेक्तीचा एकदा विश्वास उडाला तर तो आयुष्य भर तुमच्या वर विश्वास
नाही ठेवणार. स्वार्थ वापरला पाहिजे, पण तो तेव्हा, जेव्हा समोरच्याला त्यातून काही हानी होणार नसेल तेव्हा.
स्वार्थ हा चांगल्या कामसाठी वाईट कामासाठी नाही म्हणजे, वरील सांगितल्या प्रमाणे की त्यातून दुसऱ्यांना
हानी नाही झाली पाहिजे किंवा त्यांचं मन ही नाही दुःखावल पाहिजे.
आयुष्यात स्वार्थ असला पाहिजे पण चांगल्या कमा साठी जसे की, तुम्हाला एखादी परीक्षा
पास व्हायची आहे आणि आणि त्या साठी तुम्ही जीव तोडून प्रयत्न करत आहात, पण ह्या ठिकाणी आपला स्वार्थ
चांगल्या कामासाठी वापरला जात आहे. आता जर ह्या ठिकाणी तुम्ही जर एखाद्या परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि
तुमची तयारी बऱ्य पैकी तयारी झाली आहे आणि अश्य वेळी एखाद्याने तुमची मदत मागितली तर त्याला तुम्ही सांगितलं
की माझाच अभ्यास नाही झाला आहे हे कितपत योग्य आहे. आपल्या स्वार्थसाठी आपण समोरच्याला खाली ओढत असू तर
त्यात काही तथ्य नाही.
आयुष्य जगत असतांना आपल्याला कोणत्या-न-कोणत्या गोष्टीची आवश्यकता भासत असते. त्याच
गोष्टी आपल्या जवळ असतातच अस नाही. आयुष्यात सर्व काही गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष कसा
करायचा हे आपल्या हातात असत. जर आपल्या एखादी गोष्ट लागत आहे आणि ती गोष्ट जर खुप गरजेची आहे. तर आपणतीला
स्वतःच्या हिमतीवर कमावली पाहिजे आणि स्वतः कमावलेली कोणतीही गोष्टची जान राहते. कारण, स्वतः कमावालेली
कोणतीही गोष्ट कोणत्या पद्धतीने आणि किती कष्टाने कमावलेली आहे, हे आपल्याला माहीत असते.
मानवजातीचा एक नियम आहे की, जे आपल्याकडे नाही, त्याच गोष्टींचा
आपल्याला हव्या-हव्याश्या वाटतात, कारण ते आपल्याकडे नसत ना आणि ज्या गोष्टी भले काही कामाच्या असो वा नसो.
अस नाही की आपल्याला हव्या हव्याश्य असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात. जसे की तुमच्या
हेडफोन आहे, तरीही तुम्हाला तीच गोष्ट नवीन घ्यायची आहे किंवा एअरपोड्स (airpods) घ्यायचे आहे. यात काय
कामाचं/गरजेचं आहे. आपल्याकडे जर ती गोष्ट आधीच आहे, तर कशाला पैसे वायफळ घालवायचे लोकांना जळवण्यासाठी आणि
ह्या गोष्टी जर तुम्ही लोकांना जळवण्यसाठी करत असाल, तर तुम्ही आयुष्यभर काहीच नाही करू शकणार नाही. कारण
तुम्ही आयुष्यभर त्यांच्या अपेक्षा पूर्ण ही नाही करू शकणार नाही. पण ज्या ह्याच गोष्टी ज्या दिवशी तुम्ही
स्वतःसाठी करशाल ना, तेव्हा छोट्या-छोट्या गोष्टीनं मधून पण तुम्हाला आनंद भेटेल आणि ह्या वेतिरिक्त तुमच्या
कडे ज्या गोष्टी आहेत, त्या कदाचित समोरच्या वेक्तिकडे नसेल ही किंवा त्या गोष्टी समोरच्या वेक्ती साठी ते
स्वप्न असेल म्हणून, स्वतःला येवढं भाग्यशाली समजा की काही नसेल तरी ही ठीक सर्व असेल तरीही ठीक. आपल्या कडे
ज्या गोष्टी आहे, त्या गोष्टी मध्ये समाधानी व्हायला शिका.
आयुष्यात प्रत्येक गोष्टी आपल्या झाल्या, तर आयुष्य किती सहज आणि सोप होऊन
जाईल. त्यासाठी आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी लढव लागत, पण ते ही प्रामाणिक पणे.